Showing posts with label Marathi Kavita. Show all posts
Showing posts with label Marathi Kavita. Show all posts

Tuesday, February 26, 2008

माझी अमेरिकेत झालेली पहिली कविता - Aditi Chiplunkar

परतून यावे सोळावे वर्ष
परतून यावे ते दिवस
मानसिकता राहावी अशी
की झकोळून जावी ही आवस.

स्वप्न पडावीत तशीच निरागस
आकाश वाटावे तितकेच ताजे
सगळी कटुता विसरून जाऊन
जग पुन्हा व्हावे माझे.

पण यावेळी ती चूक
मी पुन्हा करणार नाही
आयुष्याला परत एकदा
गृहीत धरणार नाही.

तीच माणसे, त्याच घटना,
द्रूष्टिकोनही तोच हवा,
माझ्याकडून मात्र आपुलकिचा
थोडा अधिक वर्षाव व्हावा.

समजून घेईन यावेळी सगळ्यांना,
समजून घेईन सगळेच अर्थ
एकही व्यक्ती, एकही संधी,
मी जाऊन देणार नाही व्यर्थ.

Thursday, August 30, 2007

कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...........

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही ..........................

Thursday, July 05, 2007

प्रेमाचे तराणे !!!

प्रेमाचे तराणे !!!


हरवले स्वप्नांच्या जगात.. धुंद झाले आज अशी,
सत्य होते की स्वप्नं ... सांग मला भेट आपली !

भाव डोळ्यातले तुझ्या, वेड मजला लावून गेले ...
मिटलेले ओठ तुझे ... गुपित सारे सांगून गेले,

का वाटले असे, नाते आहे काही जन्मोजन्मीचे ?
प्रत्येक शब्दात तुझ्या, सूर होते आपुलकीचे ...

शब्द माझे, सूर तुझे... मिळूनी होईल सुंदर गाणे,
तुझ्यासाठीच ह्रुदय माझे.... गात आहे प्रेमाचे तराणे !!!

रोमांचित एकांत !!!

रोमांचित एकांत !!!


आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...
पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !

म्हणूनच ......
आज तुला जे काही बोलायचंय ते सारं बोलशील का ?
स्वतःला विसरून फक्त माझ्या डोळ्यांमधे हरवशील का ?

हातात हात घेऊन मनातील सारे भाव सांगशील का ?
गुपित तुझ्या ह्रुदयातील सांग ना उलगडशील का ?

सर्व दुःख यातना विसरून मनापासून हसशील का ?
झुगारून सारी बंधनं फक्त माझाच होऊन राहशील का ?

कारण .......
आज फक्त तू, मी आणि आहे श्वासात गुंतलेला श्वास ...
पुन्हा नाही मिळणार कदाचित हा रोमांचित एकांत !!!

माझ्या कविता

माझ्या कविता

जेव्हा कोणीच नसतं माझ्याबरोबर हसणारं....
माझं दुःख समजून प्रेमाने जवळ घेणारं ...

तेव्हा माझ्या कविता माझ्याशी बोलू लागतात,
त्याच माझ्याबरोबर हसतात, त्याच माझ्याबरोबर रडतात...

धीर देऊन सांगतात.. तू नाहीस एकटी,
घेऊन येतात बरोबर खूप साऱ्या आठवणी.

आठवणींच्या जगात फिरताना दुःख मनातले विरून जाते,
मात्र तिथून परत येताना अंतःकरण जड होते.

वास्तवाशी सामना करताना मनाला थोडं समजवावं लागतं...
मनातले दुःख लपवून चेहऱ्यावर हसू फुलवावं लागतं !!!

नाती

नाती

नाती असतात किती विचित्र आणि मजेशीर !!!

काही अगदी जवळची,
तर काही अशीच वरवरची...

नाती काही क्षणातच जुळणारी,
तर काही अनेक वर्षातही न जाणवणारी...

काही नात्यांना देता येत नाही नाव,
तरीही ती असतात खूपच खास !

काही नाती ह्रुदयात घर करून रहणारी,
दूर राहूनही कधीच न तुटणारी...

मात्र काही नाती तुटल्यानंतरही,
जन्मभर आठवत राहणारी ........

इंद्रधनुष्य

इंद्रधनुष्य

आयुष्याच्या एकाकी वळणावर ...
तू असा अचानक भेटलास,
कळलेच नाही कधी झाले,
मैत्रीचे रूपांतर प्रेमात.

प्रेमाची मोहक दुनिया पाहण्याचा
मोह मनाला होताच,
पण वाटले नव्ह्ते कधी ...
स्वप्नंही येईल प्रत्यक्षात.

स्वप्नातील राजकुमार अचानक
असा समोर येईल,
प्रेमाच्या जादुई नगरीत
आपल्याबरोबर घेऊन जाईल

आगमनाने तुझ्या...
आयुष्यच माझे बदलले,
रखरखीत ऊन्हात जसे,
सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलले !!!

तुझा सहवास

तुझा सहवास

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
जणू अनमोल मोत्यासारखा....

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
ह्रुदयात जपून ठेवण्यासारखा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
हवाहवासा वाटणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
मन मोहवून टाकणारा...

तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण
वाटे कधीच संपू नये...

तुझ्या सहवासात मी असेच स्वतःला
विसरून जावे !!!

तुझ्या डोळ्यात होती जादू

तुझ्या डोळ्यात होती जादू .. तुझ्या शब्दांमध्ये होती जादू ,
तुला पाहिल्यापासून सुचतच नाही .. काय करू ???

मन झाले आहे वेडेपिसे .. फक्त तुला भेटण्यासाठी !
तुझ्या डोळ्यात बघताना .. स्वतःला विसरण्यासाठी !

मिटले जरी डोळे तरी.. समोर फक्त तूच आहेस ,
उघड्या डोळ्यांमध्ये ही आता तुझेच स्वप्नं आहे ...

ह्रुदयात कधी घर केलेस .. माझे मलाच कळले नाही !
खरोखर .. आजपर्यंत कोणाशीही सूर असे जुळले नाही

नजरेची भाषा

नजरेची भाषा

तुझ्याशी काय काय बोलायचं,
हे आधीच मनाशी ठरवून येते...
पण तू समोर आल्यावर मात्र,
सारं काही एका क्षणात विसरून जाते !

मनात साठवलेले शब्द,
तुला पाहिल्यावर मनातच राहतात...
मनातील भाव मग हळूच,
डोळ्यांमध्ये उतरतात !

सुरू होते मग नजरेची भाषा,
जी कळते फक्त तुला नि मला...
वाटते असेच हरवून जावे तुझ्या डोळ्यात,
विसरून साऱ्या जगाला !!!

मनातील शब्दांची फुलपाखरे

मनातील शब्दांची फुलपाखरे

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली ...
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !

कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी ...

मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली...
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी ...
आपल्या भावना समजून घेणारी !

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !

सांगेन पुन्हा कधीतरी

सांगेन पुन्हा कधीतरी

मी किती किती तळमळलो,
तुला टाळताना प्रिये
मी किती किती जळलो..
मी भांडलो तुझ्याशी
मीपणाला माझ्या मी भुललो,
काटा बनुन वाटेवरला
माझ्याच पायात सललो...
येताना डोळ्यात होते आसु
मझ्याच पाउलात मी असा अडखळलो,
पुन्हा फ़िरुन मी प्रिये
तुझ्याच कुशीत शिरलो.....

सांगेन पुन्हा कधीतरी!

पाऊस

पाऊस नसतोच कधी खरा पाऊस
ते असतं फक्त आपलं म्हणणं
नाही तर
त्याला तरी कुठे मान्य आहे
असं जीव तोडून बरसणं

आज वळव्याचा पाऊस आला
आणि धरणीशी वाङ्‌निश्चय
करून गेला.

हिरव्या वस्त्रात तू सजणार
रान फुलांचा गजरा तू माळणार
इंद्र धनूचा मुकुट चढवणार
लता वेलीचे बाशिंग बांधणार
अशी शृंगाराची चाहूल देऊन गेला.

कोकीळ स्वरांची मैफिल रंगणार
मयूर भान हरवून नाचणार
काजव्यांची रोषणाई झगमगणार
विजेची आतषबाजी होणार
अशी विवाह सोहळ्याच्या ओल्या
स्वप्नांची कुजबुज करून गेला

नद्या तलाव ओसंडून वाहणार
तहानलेल्या विहिरी तृप्त होणार
उन्हाळलेली शेत पिकात डुबणार
पशू, पक्षी सारेच सुखावणार
अशी सुखी संसाराची
स्वप्ने रंगवून गेला.

तो दिवस मी विसरु कसा....॥

तो दिवस मी विसरु कसा....॥

एकदा ती दिसली....
ह्रदयातच जाऊन बसली..
कधी स्वप्नात तर कधी
मनात येवून छळू लागली..
तो दिवस मी विसरु कसा....॥

मग इंद्रधनुष्य रोज दिसू लागले..
सर्व झाडे,हिरवळ-सगळे बहरले..
मेघ आनंदाने रोज बरसले..
आणि काही मित्र..मात्र दूरावले..
तो दिवस मी विसरु कसा....॥

ना अभ्यासत ना खेळण्यात मन रमायचे
आपण-आपण एकटेच दिवसभर घुटमळायचे
उगाच कोणावरही त्रागा काढायचे
मन असे नेहमीच काबूतून सुटायचे...
तो दिवस मी विसरु कसा....॥

आधी दहा मग पाच आता दोनच मित्रांवर आलो..
तरीदेखील तिच्याच विचारात गुंतून राहिलो..
परिक्षा दोन दिवसांवर असतांना एकटाच खोलीत बसलो..
आणि पाहतो तर काय? अभ्यासात पुरताच खचलो..
तो दिवस मी विसरु कसा....॥

निकालानंतर फक्त ओरडतोच आहे...
विना मित्रांचा हंबरडतो आहे...
तो दिवस मी विसरु कसा....॥

ajun ek possibility

पण एक आनंदची बातमी सांगू.......
ती मला एकदा भेटली आणि माझीच झाली..
माझ्या आयुष्यात एकदमच दिवाळी आली..
आता नव्या उमेदीनं अभ्यास करीन....
गमावलेले मित्र पुन्हा मिळवीन....
आणि खऱ्या प्रेमाची ताकद
या साऱ्या दुनियेला दाखविन....
तो दिवस मी विसरु कसा....॥
तो दिवस मी विसरु कस

Sunday, October 08, 2006

भोगले जे.....Suresh Bhatt

भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले

लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले

गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
Suresh Bhatt

Wednesday, September 20, 2006

कसे सरतील सये

झेपेल तेव्ह्ढच दुख: तो आपल्याला देतो,
दिलेलं दुख: संपलं, की आपल्यालाच नेतो!!!

दिवस असे की कोणी माझा नाही,
अन मी कोणाचा नाही.

मी धुकेही पाहिले अन्‌ धबधबेही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला!

कसे सरतील सये मझ्याविना दिस तुझे
सरताना आणी सांग सलतील ना
गुलाबाचि फूले दोन रोज रात्रि डोळ्यावर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ?

------------------संदिप खरे